हजारो रिक्षा-टॅक्सींकडून मनमानी भाडेवसुली; वाढीव मुदत देऊनही अनेक गाडय़ांचे मीटर रिकॅलिब्रेशन बाकी

रिक्षा-टॅक्सींची भाडेवाढ होऊन चार महिने उलटत आले तरी मुंबईतील 10 हजारांहून अधिक टॅक्सी व  50 हजारांहून अधिक रिक्षांनी मीटर रिपॅलिब्रेशन केलेले नाही. नव्याने दिलेली 31 मेची ‘डेडलाईन’ संपण्यास केवळ तीन दिवस बाकी आहेत. या अवधीत सर्व रिक्षा-टॅक्सींचे मीटर रिपॅलिब्रेशन पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हजारो रिक्षा-टॅक्सीचालकांकडून मनमानी भाडेवसुली सुरूच राहणार असल्याचे चित्र आहे. 

मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सींच्या भाडेदरात 1 फेब्रुवारीपासून तीन रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानुसार सुधारित दराने भाडे घेण्यासाठी रिक्षा-टॅक्सींनी मीटरमध्ये सुधारणा (रिपॅलिब्रेशन) करण्यास 90 दिवसांची मुदत देण्यात आली होती. ती मुदत 30 एप्रिलला संपली. त्या अवधीत अनेक गाडय़ांचे मीटर रिपॅलिब्रेशन बाकी राहिल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) 31 मेपर्यंत मुदतवाढ दिली. वाढीव मुदत मिळूनही शहर व उपनगरांतील अद्याप हजारो टॅक्सी आणि रिक्षांचे मीटर रिपॅलिब्रेशन झालेले नाही. ताडदेव, वडाळा, अंधेरी व बोरिवली येथील आरटीओ कार्यालयांकडील 28 मे रोजीच्या नोंदीनुसार, 10,364 टॅक्सी आणि  50,914 रिक्षांचे मीटर रिपॅलिब्रेशन बाकी आहे. मीटरमध्ये अनिवार्य सुधारणा करण्यास हजारो रिक्षा-टॅक्सीचालक तयार नसल्याने त्यांच्याकडून मनमानी भाडेवसुली सुरू राहणार आहे. आरटीओने संबंधित रिक्षा आणि टॅक्सीचालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करून प्रवाशांची लूट थांबवावी, अशी मागणी मुंबईकरांकडून केली जात आहे.

दंडात्मक कारवाई की पुन्हा वाढीव मुदत?

मीटर रिपॅलिब्रेशन करण्यासाठी वाढीव मुदत देऊनही अनेक रिक्षा-टॅक्सीचालक मीटरमध्ये सुधारणा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्यावर नियमानुसार फ़ाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आरटीओ 1 जूनपासून रिक्षा-टॅक्सीचालकांवर दंडात्मक कारवाई करणार की मीटर रिपॅलिब्रेशनसाठी पुन्हा वाढीव मुदत देणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

मीटर रिपॅलिब्रेशन बाकी (28 मे 2025 पर्यंतची आकडेवारी)

अंधेरी

रिक्षा 18,111

टॅक्सी 857

बोरिवली

रिक्षा  13,466 

टॅक्सी 1642

वडाळा

रिक्षा 19,337 

टॅक्सी 2965

ताडदेव 

टॅक्सी  4900