पंचनाम्याचे घोडे नाचवत बसू नका, ओला दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्या, अशी मागणी शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सरकारकडे करण्यात आली आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे यांनी या संबंधीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. – या निवेदनावर माजी उपसरपंच विजय माने, माजी उपसरपंच अॅड. विकास जरांडे, माजी उपसरपंच उत्तम हनपुडे, शाखाप्रमुख भाऊ मस्तूद, बालाजी वाडेकर, शिवाजी नाईकनरे, शिवाजी लोंढे, अविनाश गाडे, बाळासाहेब पाटील आदींच्या सह्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, मे – महिन्यातच होत असलेल्या अवकाळी पावसामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. कांदा, – फळभाज्या, केळी, डाळिंब, पेरू, भुईमूग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने घरांचे पत्रे, छप्पर उडून नुकसान झाले आहे. दुभत्या गायी, बैल, म्हशींसाठी अनेकांनी ओला चारा केला होता. सततच्या पावसाने त्याचेही नुकसान झाले असून, चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व मशागती केल्या होत्या. मात्र, सततच्या मूर पावसाने शेती चिबडूण गेली आहे. यामध्ये आता लव्हाळा, व इतर गवत वाढणार असल्याने ही जमीन पेरणीयोग्य करण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांना मशागत करावी लागणार आहे. त्यातच मान्सूनचे आगमन झाल्याने आता लवकर वापसा होणे अशक्य असल्याचे दिसत आहे. एकंदरीत सध्या ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पंचनाम्याचे घोडे न नाचवता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांनी महसूल विभागाकडे केली आहे.