
बाजारात मिळणाऱ्या शॅम्पूमध्ये रसायनांचे प्रमाण अधिक असते. यामुळे केसांच्या मुळांना नुकसान पोहोचते. याचा परीणाम म्हणुन केस गळणे, केसांना फाटे फुटणे, केसांना नैसर्गिक चमक न राहणे असे अनेक प्रश्न निर्माण होतात. यावर उपाय म्हणजे घरच्या घरी तयार केलेला आयुर्वेदिक शॅम्पू. केवळ काही नैसर्गिक आणि सहज उपलब्ध घटक वापरून तुम्ही हा शॅम्पू तयार करू शकता. यामध्ये असलेले रिठा, शिकाकाई, आवळा आणि मेथी तुमच्या केसांना मजबुती, चमक आणि लांबी देतात. हे तयार करण्यासाठी घरगुती सोपी पद्धत जाणून घ्या.
सर्व प्रथम (शिकाकाई, रिठा ,आवळा) यांची पावडर आणि मेथी दाणे एका भांड्यात घ्या आणि त्यामध्ये 2 कप पाणी घालून रात्रभर भिजवत ठेवा.
दुसऱ्या दिवशी हे मिश्रणला मंद आचेवर 15-20 मिनिटे उकळवून घ्या.
मिश्रण गार झाल्यावर ते मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्या आणि एका भांड्यात गाळुन घ्या. नंतर त्यामध्ये खोबरेल तेल किंवा एरंडेल तेल मिक्स करा तसेच आवडत असल्यास त्यामध्ये असेंशिअल ऑइल घालू शकता.
हे सर्व मिश्रण स्वच्छ काचेच्या बॉटल मधे ठेवा. हा रसायनमुक्त शॅम्पू वापरु शकता. आठवडाभर हा घरगुती शॅम्पू फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता.
या शॅम्पूमधील नैसर्गिक घटकांचे फायदे
शिकाकाई: हे केसांना पोषण देते, केसांची वाढ वाढवते, केसांमधील कोंड्याशी लढण्यासाठी आणि केस गळती नियंत्रित करण्यास मदत करते.
रिठा: नैसर्गिक फेस तयार करते, केसांमधील घाण आणि तेल काढून टाकण्यास रिाठा ची मदत होते .
आवळा: केसांची मुळे मजबूत करते, केसांची वाढ होते, केस पांढरे होण्यापासुन थांबवते.
मेथी: केस गळणे कमी करते, केसांचे आकारमान आणि केसांमधील मऊपणा वाढवते.
नारळ/एरंडेल तेल: टाळूला मॉइश्चरायझ करते, केसांची वाढ वाढवते.
शॅम्पू वापरण्याआधी एकदा त्वचेवर टेस्ट करा. कोणत्याही घटकाची अॅलर्जी असल्यास वापर टाळा.