शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मराठवाड्यात शिवसेनेचे आंदोलन

सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक प्रचारात महायुती सरकारने शेतकऱयांना अनेक आमिषे दाखवली होती. मात्र सत्ता मिळताच शेतकऱ्यांना वाऱयावर सोडणाऱया सरकारला शिवसेना ‘क्या हुआ तेरा वादा?’ असा सवाल करणार आहे. 5 जून ते 12 जून या कालावधीत संपूर्ण मराठवाडय़ात या आंदोलनाचे रान पेटणार आहे. या आंदोलनात शेतकऱयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना पदाधिकाऱयांच्या वतीने करण्यात आले आहे.

महायुती सरकारने केलेले वादे

  • शेतकऱयांना कर्जमुक्त करणार, शेतकरी सन्मान योजनेतून 15 हजार रुपये देणार.
  • लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार.
  • 45 हजार गावांमध्ये पाणंद रस्ते.
  • खतांवर एसजीएसटी अनुदानाच्या स्वरूपात परत करणार.
  • वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये देणार.
  • शेतीला 24 तास वीज देणार.
  • शेतमालाला हमीभाव देणार.
  • बी, बियाणांच्या किंमती नियंत्रणात ठेवणार.
  • हर घर जल, हर घर छत.
  • मराठवाडा वॉटर ग्रीडला केंद्राकडून मान्यता मिळवणार.

असे होणार आंदोलन…

  • 5 जून ः जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी,
    तलाठी यांना निवेदन.
  • 6, 7 जून ः सत्ताधारी पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार यांना पारंपारिक वाद्यांच्या गजरात ‘क्या हुआ तेरा वादा? असा सवाल करून निवेदन.
  • 8, 9, 10 जून ः शिवसेना पदाधिकारी दररोज पाच गावात बैठका घेऊन शेतकऱयांशी संवाद साधणार, सरकारने केलेल्या फसवणुकीची माहिती देणार.
  • 11 जून ः तालुक्याच्या ठिकाणी बैलगाडी, टॅक्टर मोर्चा
  • 12 जून ः जिल्हास्तरीय ‘चक्का जाम’ आंदोलन