
अमेरिकेच्या मध्यस्थीमुळेच हिंदुस्थान आणि पाकिस्तानात शस्त्रसंधी झाली. आपल्यामुळेच दोन्ही देशांमधील सशस्त्र संघर्ष थांबला, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत आहेत. ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतिन यांच्याकडे देखील याचा पुरुच्चार केला आहे. त्यावरून आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी यावरून भाजपला फटकारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक आव्हान दिले आहे.
”अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 11 वेळा एकच गोष्ट सांगितली आहे. ते प्रत्येक वेळी हेच म्हणाले की मोदीजींवर मी दबाव टाकल्यानंतर युद्धबंदी झाली. नरेंद्र मोदींनी यावर एकदाही प्रतिक्रिया दिली नाही. मी मोदीजींनी एकदा तरी सांगावं की ट्रम्प खोटं बोलत आहेत, असे आव्हान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.
बिहार क्राईम कॅपिटल ऑफ इंडिया, राहुल गांधींची नितीशकुमारांवर टीका
नालंदामध्ये विद्यापीठ होते. जगभरातून लोक या विद्यापीठात येत होते. पण आज उलट परिस्थिती आहे. बिहारचे नागरिक इतर राज्यात आणि जगभरात जात आहेत, कारण इथे रोजगार नाही, अशा शब्दांत लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका केली. बिहारमधील राजगीर येथे आयोजित ‘संविधान सुरक्षा संमेलन’मध्ये राहुल गांधी यांनी नागरिकांशी संवाद साधला.
बिहार कुठे होते आणि आता कुठे पोहोचले आहे. आज जपान, कोरिया, चीनची चर्चा होते. मात्र, त्यांचा जी विचारसरणी आहे ती कुठून आली? ती तुम्ही दिली आहे. बिहारमधून कुवेत, श्रीलंका, कोरिया, जपानमध्ये विचार गेले, याला म्हणतात बिहार, असे राहुल गांधी म्हणाले. तुम्ही नाही तुमचे सरकार हे सर्वकाही विसरले आहे. बिहारला क्राईम कॅपिटल बनवले आहे, अशी सडकून टीका राहुल गांधी यांनी केली.