
‘मन की बात’ करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जन की बात’ मात्र सातत्याने टाळत आले असून पंतप्रधानपदाच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात एकही पत्रकार परिषद न घेण्याचा नवा विक्रम त्यांनी नोंदवला आहे. यावर काँग्रेसने एक्स पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
मोदी सरकारच्या तिसऱया कार्यकाळाचं एक वर्ष उद्या पूर्ण होत आहे. सलग 11 वर्षे मोदी पंतप्रधान आहेत. मात्र, या काळात पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपासून ते नेहमीच दूर राहिले आहेत.
बेरोजगारी, महागाई, गरिबी, महिला सुरक्षा, गटांगळ्या खाणारा रुपया, डामाडौल अर्थव्यवस्था, मणिपूर, पुलवामा ते पहलगामपर्यंतचे दहशतवादी हल्ले यावरील प्रश्नांच्या भडीमाराला मोदी घाबरत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.