Air India Plane Crash – टेकऑफ दरम्यान विमानं कोसळण्याची नेमकी कारणं कोणती?

गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग 737 प्रवासी विमान कोसळले आहे. अपघातानंतर आगीच्या मोठ्या ज्वाळा बाहेर पडल्या आणि धुराचे लोट दिसले. अहमदाबाद विमानतळावरील हे फोटो भयावह आहेत. मुख्य म्हणजे टेकऑफ दरम्यान हा विमान अपघात झाल्याचे वृत्त आहे. टेकऑफ दरम्यान असे अपघात जास्त का होतात ते आपण जाणून घेऊया.

विमानाच्या टेकऑफचा काळ हा फार महत्त्वाचा मानला जातो. एकूणच विमान अपघाताची आकडेवारी पाहता, अंदाजे 35 टक्के अपघात टेकऑफ दरम्यान किंवा त्यानंतर लगेच होतात.

MAYDAY… MAYDAY… पायलटने पाठवला आपत्कालीन संदेश, कॅप्टन सभरवाल यांना 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव

एकदा विमानाने उड्डाण घेतल्यानंतर मात्र अपघाताचे प्रमाण हे फारच कमी असते. उड्डाणाच्या वेळी विमान जमिनीपासून जास्त वेग घेते. यावेळी पायलटला धावपट्टी, इंजिन, हवामान आणि विमान प्रणालींवर बारकाईने लक्ष ठेवावे लागते.

उड्डाणाच्या वेळी इंजिनची कमाल क्षमता असते. अशा परिस्थितीत इंजिनमधील कोणत्याही तांत्रिक बिघाड जसे की, पक्षी आदळणे, इंधन दाबाची समस्या किंवा इतर काही तांत्रिक दोष यामुळे त्वरित अपघात होऊ शकतो.

विमान अपघाताचे अजून एक मोठे कारण हे वैमानिकाची चूक असू शकते. विशेषतः टेकऑफ दरम्यान, पायलट पिच अँगल, वेग आणि रनवे लिफ्ट-ऑफ पॉइंटचा चुकीचा अंदाज घेतो. बहुतेक विमान अपघात हे टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान मानवी चुकांमुळे होतात.

विमान अपघातांमध्ये वादळांचा गडगडाट, जोरदार वारे तसेच कमी दृश्यमानता किंवा टेकऑफ दरम्यान मायक्रोबर्स्ट यासारख्या गोष्टी देखील कधीकधी अपघातांना कारणीभूत ठरतात. अलिकडेच दिल्लीत खराब हवामानामुळे एक विमान वादळात अडकले होते. तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

विमान अपघातांमध्ये टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड महत्त्वाची भूमिका बजावतात. कधीकधी विमानाच्या लँडिंग गियर, ऑटोथ्रॉटल सिस्टीम, हायड्रॉलिक्स किंवा एअरस्पीड इंडिकेटरमधील बिघाडामुळे अपघात होऊ शकतो.