
सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी ते माणिकबाग हा उड्डाणपूल पूर्ण होऊनसुद्धा फक्त सत्ताधारी नेत्यांच्या उद्घाटनासाठी वेळ न मिळाल्याने जनतेला वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या या ज्वलंत प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले.
सिंहगड रोडवरील नवीन उड्डाणपुलावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेसमोर ‘ॐ फट स्वाहा’ म्हणत होम-हवन करून पूल जनतेसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, पुलाचे काम जनतेच्या कररूपी पैशातून पूर्ण झाले असूनही केवळ सत्ताधाऱ्यांच्या उद्घाटन सोहळ्याच्या हव्यासापोटी नागरिकांची गैरसोय केली जात आहे.
यावेळी महापालिकेचे प्रकल्प अधिकारी संभाजी कोटकर उपस्थित होते. त्यांनी येत्या ४ दिवसांत सर्व कामे पूर्ण करून हा उड्डाणपूल सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, महिला आघाडीच्या पद्मा सोरटे, सचिन पासलकर, संतोष गोपाळ, नितीन वाघ, महेश मते, गोकुळ करंजावणे, अनंत घरत, किशोर रजपूत, महेश पोकळे, अमोल दांगट, सूरज लोखंडे, वैभव हनमघर, पराग थोरात, दिलीप पोमण, राजाभाऊ चव्हाण, शिवा पासलकर, नाना मरगळे, नागेश खडके, प्रसाद गिजरे, मिलिंद पत्की, उमेश सुर्वे, अरुण घोघरे, दत्ता घुले, संग्राम गायकवाड, निलेश वाघमारे, महेश विटे, गणपत खाटपे, धनंजय खाडे, प्रथमेश भुकन, कल्पेश वाजे, केतन शिंदे, विनायक नलावडे, आकाश यादव तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.