
लातूर जिल्ह्यात पावसाने अक्षरश: कहर केला असून अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक भागातील वाहतूक सेवा स्थगित करण्यात आली आहे. जळकोट तालुक्यातील रस्ते वाहतूकही ठप्प झाली आहे. तालुक्यातील अनेक मार्गावरील वाहतूक पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद करण्यात आली आहे.