जम्मू-कश्मीर आणि लडाख दोघांचाही विश्वासघात केला, ओमर अब्दुल्ला यांची मोदी सरकारवर टीका

omar-abdullah

जम्मू आणि कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर आश्वासने पूर्ण न करून लडाख आणि जम्मू – कश्मीर दोघांचाही विश्वासघात केल्याचा आणि राज्याचा दर्जा पुनर्संचयित करण्यास विलंब करून अविश्वास वाढवल्याचा आरोप केला आहे. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, सरकार आधी जम्मू आणि कश्मीरसाठी आणि आता लडाखसाठी आपला रोडमॅप अंमलात आणण्यात अपयशी ठरले आहे. त्यांनी आरोप केला की लडाखला अशक्य आश्वासने देऊन दिशाभूल करण्यात आली आहे.

जम्मू आणि कश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करत ओमर अब्दुल्ला म्हणाले, “तुम्ही आम्हाला सांगितले की, ही तीन टप्प्यांची प्रक्रिया आहे. पहिले सीमांकन, नंतर निवडणुका आणि शेवटी राज्याचा दर्जा. पहिले दोन टप्पे पूर्ण झाले आहेत, परंतु तिसरा टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही.