Photo – उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हंबरडा मोर्चा, सरकार विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश

निष्क्रिय सरकारविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा हंबरडा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चाला संबोधित करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारची सालटीच काढली. हा हंबरडा मोर्चा नसून इशारा मोर्चा आहे. या खोके सरकारला वठणीवर आणण्यासाठी शेतकऱ्यांना आता हातात आसूड घ्यावाच लागेल. तसेच न्याय मिळाल्याशिवाय आता शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.