महाराष्ट्रात सर्पाकार परिस्थिती असून तीन साप प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात धरून एकमेकांना गिळायला बसलेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महायुतीवर केला. अशी गिळागिळी सुरू झाली तर जनतेकडे कोण बघणार, असा सवालही त्यांनी केला.



























































