अंबरनाथमध्ये भाजप-मिंधे गटात राडा, पोलिसांचा लाठीचार्ज

अंबरनाथमधील मातोश्रीनगर परिसरात भाजप व मिंधे गटात राडा झाला. भाजपकडून मतदारांना पैशाचे वाटप केले जात असल्याचा आरोप मिंधे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.त्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे.