
हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार?, ढेकळांचे पंचनामे करायचे का, असे विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते. आता कोकाटे यांची विधानं मलाच महागात पडायला लागली आहेत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, काही गोष्टी मनात ठेवल्या पाहिजेत, कोकाटेंना अजूनही मनात गोष्टी ठेवता येत नाही. शेतकऱ्यांविषयी बोलताना जपून बोललं पाहिजे. मी सुद्धा शेतकरी आहे. पण कोकाटे जे बोलतात त्यांना तर महागात पडतंय मलाही मलाही महागात पडंतय असेही अजित पवार म्हणाले.