
दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद करा, अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल असे मत नायडू यांनी व्यक्त केला आहे.
तेलुगू देसम पक्षाच्या एका सभेत बोलताना नायडू म्हणाले की देशात 500 आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्या पाहिजे. लोकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहार करावे असे आवाहन केले आहे.
नायडू म्हणाले की जेव्हा मी पंतप्रधान मोदींना डिजिटल करन्सीवर अहवाल दिला होता. तेव्हा त्यांना म्हटलं होतं की 500, हजार आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या पाहिजेत. डिजिटल व्यवहार वाढवला पाहिजे. जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर आपल्याला ताडीने लक्षात येईल असे नायडू म्हणाले होते.जगात ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे आपणही ऑनलाईन व्यवहार वाढवले पाहिजे असे नायडू यांनी सांगितले.
पक्षासाठी दान करण्यासाठी पूर्वी संपूर्ण यादी पहावी लागत होती, आता फक्त क्युआर कोड वरून दान करता येतं. आता पूर्वीसारखं 500, 100 आणि 2000 रुपयांची नोट वाचवण्याची गरज नाही असेही नायडू यावेळी म्हणाले.