
मलबार हिलमध्ये एक संरक्षक भिंत कोसळली होती. ही भिंत बांधण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी लागेल असे पत्र भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सरकारला दिले आहे. म्हाडाने या भागाचा सर्वेही सुरू केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. मुसळधार पावसामुळे मलबार हिलमधील रुबी हिल 47 या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली होती. ही भिंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपाल आणि पालिका आयुक्तांच्या निवासस्थानापर्यंत जाते. ही भिंत पुन्हा बांधण्यासाठी पाच कोटी रुपयांच खर्च होईल. यासाठी स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सरकारला पत्र लिहिले आहे.
रुबी हिल 47 ही इमारत धोकादायक असून इथल्या रहिवाशांना दुसरीकडे हलवण्यात आले आहे. पण या रहिवाशांनी इथून गेल्यास परत इथे जागा मिळणार नाही अशी भिती व्यक्त केली आहे. या इमारतीतील रहिवाशांना भायखळाच्या घोडपदेव भागात ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवण्यात आले आहे. ही इमारत लवकरच तोडण्यात येईल असे प्रशासनाने म्हटले आहे. पण या भागाचे आपण जुने रहिवासी आहोत. 1950 सालचे भाडं भरल्याची पावतीही आपल्याकडे असल्याचे रहिवाशांनी म्हटले आहे. त्यामुळे आपले पुनर्वसन इथेच व्हावे अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे.