जगाला सांगत आहेत पण संसदेत नाही, ऑपरेशन सिंदूरवर विशेष अधिवेशन बोलवा; 16 पक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र

ऑपरेशन सिंदूर प्रकरणी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे. मंगळवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला जयरामर रमेश, संजय राऊत, राम गोपाल यादव मनोज झा आणि डेरेक ओब्रयन उपस्थित होते.

दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर 16 विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. ऑपरेशन सिंदूरप्रकरणी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. तसेच पहलगाम, पुंछ, उरी आणि राजौरीमध्ये जे हल्ले झाले त्यावर आणि हिंदुस्थान आणि पाकिस्तान दरम्यान जो संघर्ष झाला त्यावरही चर्चा व्हावी असेही पत्रात म्हटले आहे.

या पत्रात काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, इंडियन युनियन मुस्लीम लीग, राजद, द्रमुक, शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे), राजद, नॅशनल कॉन्फ्रन्स, माकप, कम्युनिस्ट पक्ष, रासप, झारखंड मुक्ती मोर्चा, व्हिसीके, केरळ काँग्रेस, एमडीएमक आणि भाकप या पक्षाच्या नेत्यांनी सह्या केले्या आहेत.