
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून अजित पवार गट व शिंदे गट सोबत आले तर ठीक, अन्यथा भाजप स्वतंत्र लढेल, असा इशारा महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार आहे. महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती करूनच लढू; परंतु अजित पवार गट आणि शिंदे गट हे एकत्र न आल्यास, जागा वाटपात पेच उद्भवल्यास भाजप स्वतंत्रपणे लढेल, अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली. सोलापूर शहर व जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असून, त्यांच्यातील गटबाजीवर सारवासारव करत भाजप एकसंध असल्याचे सांगितले.