
सिलिंडर मिळत नसल्याने पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कॅण्टीनला स्वयंपाकासाठी चुली पेटवण्याची वेळ आली आहे.
मुलींच्या वसतिगृहातही एकवेळचा स्वयंपाक चुलीवर केला जात आहे. वसतिगृहांमध्ये सुमारे 3 हजार विद्यार्थी राहतात. त्यांना सर्वाधिक फटका बसत आहे.
थाळीतील खाद्यपदार्थही कमी केले असून दर वाढवले आहेत. मंगळवारी केवळ वरण-भात उपलब्ध होता. त्यासाठी तासभर विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहावे लागले.
सिलिंडर उपलब्ध करून देण्याबाबत विद्यापीठाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही, असे सांगण्यात आले.


































































