देशात वर्षभरात 5 हजार एटीएम पडले बंद

देशात डिजिटल ट्रान्झॅक्शनची वाढ झाली असली तरी रोखीने देवाणघेवाण करण्यासाठी पैशाची कमतरता भासत आहे. त्यामुळे एटीएममधून कॅश काढण्यासाठी एटीएमबाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात 2022-23 ते 2024-25 या दरम्यान जवळपास 5 हजार एटीएम हटवण्यात आले आहेत. केवळ एटीएम नव्हे तर कॅश जमा करणाऱ्या मशीनसुद्धा कमी करण्यात आल्या आहेत.