
पश्चिम बंगाल विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या 4 भाजप आमदारांचे निलंबन करण्यात आले. गेल्या आठवडय़ातील अशोक लाहिरी आणि इतर भाजप आमदारांच्या टिपण्ण्या कामकाजातून काढून टाकण्यात आल्या. यावरून भाजप आमदारांनी सोमवारी सभागृह सुरू होताच सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांच्यासह चार आमदारांना निलंबित केले.