शेतकर्‍यांना दिलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्ती करा नाहीतर खुर्ची खाली करा – अंबादास दानवे

जालन्यातील बदनापुर तालुक्यातील गेवराई बाजार येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘क्या हुआ तेरा वादा’ या जन आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारण्यात आला. निवडणुकीपूर्वी मोठमोठे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या फडणवीस- शिंदे – अजित पवार दळभद्री सरकारने शेतकर्‍यांना दिलेला आश्वासनाची पूर्ती करावी अन्यथा खुर्ची खाली करावी, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात 5 ते 12 जूनपर्यंत ‘क्या हुआ तेरा वादा’ या प्रश्नावर जाब विचारण्याकरिता जन आंदोलन करण्यात येणार असून त्या अनुषंगाने बदनापूर विधानसभा मतदारसंघातील गेवराई बाजार येथे शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधून हे आंदोलन करण्यात आले. या सरकारने सत्तेत येण्यासाठी या राज्यातील जनतेला मोठी आश्वासने दिली त्यामध्ये शेतकर्‍यांना कर्जमुक्ती देणार, शेतकरी सन्मान योजनेतून 15 हजार रुपये देणार, लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये देणार, 45 हजार गावांमध्ये पानंद रस्ते बांधणार, शेतकर्‍यांच्या खतावरील जीएसटी परत करणार, वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये देणार, अन्नदाता उर्जादाता, शेतकर्‍यांना शेतीसाठी 24 तास वीज देणार, शेतीमालाला हमीभाव देणार, खतांच्या किमती नियंत्रित करणार, वाटर ग्रीड प्रकल्प यांसारखे अनेक आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या फडणवीस
सरकारला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडलेला असून त्यांनी तातडीने आश्वासनाची पूर्ती करावी नसता त्यांना या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांनी तातडीने खुर्चीवरून खाली यावे, असेही दानवे म्हणाले.

यावेळी बोलताना माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले की, महाराष्ट्रात या दळभद्री सरकारने निवडून येण्याकरता जनतेला भुल थापा दिल्या. अनेक मोठमोठी आश्वासने दिली आणि सत्तेत आल्यावर मात्र जनतेला दिलेल्या आश्वासनाचा पूर्णपणे सरकारला विसर पडला असून झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेणार्‍याला जागे करता येत नाही त्याप्रमाणे या सरकारने शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे झोपेचे सोंग घेऊन जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे, हे सरकार उद्योग धारजीने असून त्यांना शेतकर्‍यांच्या प्रश्नाविषयी कुठलेही सोयर-सुतक नाही. त्यामुळे या सरकारला झोपेतून जागे करण्याकरता ‘क्या हुआ तेरा वादा’ हे आंदोलन उभारले असून शिवसेना पक्ष सदैव शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार संतोष सांबरे शिवसेना जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, श्रीराम कान्हेरे, परमेश्वर मात्रे, यांच्यासह अंकुश पवार, संजय जाधव, राहुल चोरमारे, कारभारी मसलेकर, अनिस पठाण, अच्युत अंभोरे, विष्णू गारखेडे, संभाजी मदन, अंकुश वाघ, बळीराम कोल्हे, सुदाम काळे, दत्तू गारखेडे, राजू जराड, राहुल जरहाड, शिवाजी कराळे, रामेश्वर फंड, सुरेश घोरपडे, फैजान मिर्झा, ऋषी थोरात, संजय जराड,सुधाकर खैरे, बाबुराव गोडसे, लक्ष्मण साळवे, सुभाष आरसुळ, रमेश मोरे, विष्णू मोरे, गजानन लहाने, गजेंद्र लहाने, बाबुराव मोरे, बाबुराव लहाने, सोमनाथ कान्हेरे, योगेश लहाने, अरुण कान्हेरे, गणेश कान्हेरे, मंगेश होरशीळ, अनिल गायकवाड,बन्सी होरशीळ, राजू कानेरे, हरिभाऊ कान्हेरे, गजानन मोरे, प्रकाश राजगिरे,काकासाहेब लहाने, सिद्धू होरशीळ यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.