
देशात पुढील पाच वर्षांत म्हणजेच 2030 पर्यंत उन्हाचे चटके दुपटीने बसणार असून त्याच पटीत पावसाचा कहर पाहायला मिळेल, असा इशारा एका नव्या अहवालातून देण्यात आला आहे. देशातील मुंबई, दिल्ली, ठाणे, चेन्नई, सुरत, हैदराबाद, पटणा आणि भुवनेश्वर या प्रमुख शहरांचा यात समावेश आहे. पुढील पाच वर्षांत या शहरातील उष्णेतेची लहर दुप्पट होऊ शकते. तसेच मान्सूनमध्येही लोकांना उष्णतेची लहर जाणवू शकते. वेदरिंग द स्टोर्म, मॅनेजिंग मान्सून इन अ वार्ंमग क्लामेट या नावाने प्रसिद्ध झालेल्या एसरी इंडिया आणि आंतरराष्ट्रीय विकास समूह आयपीआय ग्लोबलने संयुक्तरीत्या हा अहवाल जारी केला आहे. जलवायू तज्ञ अविनाश मोहंती आणि पृष्ण पुमार वासव यांनी हा रिपोर्ट तयार केला आहे. रिपोर्टनुसार, उष्ण हवेमुळे हिट आणि पाऊससुद्धा अनियमित व मुसळधार होऊ शकतो. भारताच्या जवळपास 80 टक्के जिह्यांत 2030 पर्यंत मान्सूनमध्ये पाऊस आणि उष्णता दोन्ही पाहायला मिळेल. 2030 पर्यंत देशभरात 2.5 पट उष्णता वाढू शकते, तर जोरदार पावसाच्या घटनेत 43 टक्के वाढ होऊ शकते. 1993 ते 2024 यादरम्यान मार्च ते सप्टेंबरपर्यंत उष्ण लाटेच्या दिवसात 15 पट वाढ झाली आहे.