
रिक्षा भाडेवाढीला चार महिने उलटून गेले तरी ठाण्यातील हजारो रिक्षाचालकांनी रिक्षाचे मीटर अद्यापही अपडेट केले नाहीत. अशा 26 हजार रिक्षांना रोज 50 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. ज्या रिक्षाचालकांनी रिकॅलिब्रेशन करण्यास टाळाटाळ केली आहे. त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
ठाण्यातील सुमारे 77 हजार 500 अधिकृत रिक्षा आहेत. त्यापैकी केवळ 51 हजार 371 रिक्षांनीच मीटर रिकॅलिब्रेशन पूर्ण केल्याचे अधिकृत आकडे समोर आले आहेत, तर उर्वरित तब्बल 26 हजार रिक्षा अजूनही नियमबाह्य पद्धतीने भाडेआकारणी करत असल्याचे उघड रिक्षाचालकांनी जितक्या लवकर होईल झाले आहे. तितके मीटर टेरिफमध्ये बदल करणे गरजेचे होते. मात्र अजून हजारो रिक्षांनी मीटर रिकॅलिब्रेशन केले नसल्याने त्यांना दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.
रिक्षाभाडे वाढवून मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून रिक्षा संघटना मागणी करत होत्या. त्यानुसार 23 जानेवारी 2025 रोजीच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या बैठकीत रिक्षा भाडेवाढबाबत निर्णय झाला.
1 फेब्रुवारीनंतर हे दर लागू झाल्यावर मीटरच्या टेरिफमध्ये बदल होणे आवश्यक आहे. बहुतांश रिक्षांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरवर जुनेच भाडे 23 रुपये दर्शवले जाते.