
बीड जिह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या खंडणीखोरांचे साम्राज्य आहे आणि त्याला थेट राजाश्रय आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली. अनेक जिह्यांमध्ये येणाऱ्या औद्योगिक वसाहती हे त्यामागचे कारण आहे, असे ते म्हणाले.
पूर्वी राज्यात अंडरवर्ल्डचे राज्य होते, आता खंडणीखोरांनी त्याचा ताबा घेतला आहे, असे सांगतानाच, या खंडणीखोरांना रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करून तक्रारी थेट त्या विभागात येतील अशी व्यवस्था केली पाहिजे, असा सल्लाही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.