
जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सांगण्यावरून शस्त्रसंधी झाली असेल तर मग संसदेत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांच्याकडेच करायची का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच विरोधी पक्षांचा आवाज हा जनतेचा आवाज आहे असेही संजय राऊत म्हणाले.
आज इंडिया आघाडीची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, 16 पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. हे कुठलेही साधे पत्र नाही. हा जनतेचा आवाज आहे. आतापर्यंत देशात काय झालं यावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सांगण्यावरून शस्त्रसंधी झाली असेल तर विरोधकांच्या मागणीवरून विशेष संसद का बोलावले जात नाही? आता त्यासाठी पण ट्रम्प यांच्याकडे जावं लागेल का ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
#WATCH | Delhi: After the meeting of the INDIA alliance, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, “There are signatures of 16 political parties on the letter that we have written to the Prime Minister. This is not a normal letter. The opposition is the voice of the public. We want a… pic.twitter.com/74AzQuYbni
— ANI (@ANI) June 3, 2025