
सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक प्रचारात महायुती सरकारने शेतकऱयांना अनेक आमिषे दाखवली होती. मात्र सत्ता मिळताच शेतकऱ्यांना वाऱयावर सोडणाऱया सरकारला शिवसेना ‘क्या हुआ तेरा वादा?’ असा सवाल करणार आहे. 5 जून ते 12 जून या कालावधीत संपूर्ण मराठवाडय़ात या आंदोलनाचे रान पेटणार आहे. या आंदोलनात शेतकऱयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना पदाधिकाऱयांच्या वतीने करण्यात आले आहे.
महायुती सरकारने केलेले वादे
- शेतकऱयांना कर्जमुक्त करणार, शेतकरी सन्मान योजनेतून 15 हजार रुपये देणार.
- लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार.
- 45 हजार गावांमध्ये पाणंद रस्ते.
- खतांवर एसजीएसटी अनुदानाच्या स्वरूपात परत करणार.
- वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये देणार.
- शेतीला 24 तास वीज देणार.
- शेतमालाला हमीभाव देणार.
- बी, बियाणांच्या किंमती नियंत्रणात ठेवणार.
- हर घर जल, हर घर छत.
- मराठवाडा वॉटर ग्रीडला केंद्राकडून मान्यता मिळवणार.
असे होणार आंदोलन…
- 5 जून ः जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी,
तलाठी यांना निवेदन. - 6, 7 जून ः सत्ताधारी पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार यांना पारंपारिक वाद्यांच्या गजरात ‘क्या हुआ तेरा वादा? असा सवाल करून निवेदन.
- 8, 9, 10 जून ः शिवसेना पदाधिकारी दररोज पाच गावात बैठका घेऊन शेतकऱयांशी संवाद साधणार, सरकारने केलेल्या फसवणुकीची माहिती देणार.
- 11 जून ः तालुक्याच्या ठिकाणी बैलगाडी, टॅक्टर मोर्चा
- 12 जून ः जिल्हास्तरीय ‘चक्का जाम’ आंदोलन