12 वर्षांनंतर तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

फसवणुकीच्या गुह्यातील अजामिनपात्र अटक वॉरंट बजावलेले तीन आरोपी अखेर एका तसानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या हाती लागले. दोघांना ठाणे जिह्यातून तर तिसऱयाला वरळी परिसरात पकडण्यात आले.

आरीफ शेख (53) आणि झिया शेख (47) अशी दोघांची नावे असून या दोघांना युनीट-1च्या पथकाने पकडले. एकाला मुंब्रा तर दुसऱयाला राबोडी परिसरात ताब्यात घेतले. दोघेही लपून राहत होते. त्यांच्याविरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. तर गुन्हे शाखा युनीट-3च्या पथकाने मोहन कदम (54) हा फरार आरोपी वरळीत सापडला. या तिघांविरोधात दोन वेगवेगळे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. 12 वर्षांपासून ते पोलिसांना चकवा देत होते. अखेर त्यांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या.