इराणमध्ये अडकलेले 110 विद्यार्थी हिंदुस्थानमध्ये परतले, दिल्लीत उतरताच व्यक्त केली नाराजी; म्हणाले, ‘घरी जायचंय, पण…’

इस्रायल आणि इराणमधील संघर्ष वाढला आहे. दोन्ही देश इरेला पेटले आहेत. इस्रायलकडून इराणच्या तेहरान शहरावर क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असून इराणही त्याला जशास तसे उत्तर देत आहे. दोन्ही देशातील तणाव वाढत असल्याने हिंदुस्थानने इराणमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन सिंधू’ केले. या अंतर्गत इराणधून 110 हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना घेऊन आलेले विमान दिल्लीत उतरले आहे.

तेहरानमधील हिंदुस्थानी दुतावासाने उत्तर इराणमधून जवळपास 110 हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे. देशातील अनेक राज्यामधील या विद्यार्थ्यांना इराणमधून दिल्लीत आणण्यात आले असून तिथून ते आपापल्या राज्यात जात आहे. यात विद्यार्थ्यांमधील बहुतांश जम्मू-कश्मीर येथील आहे. या विद्यार्थ्यांसाठी जम्मू-कश्मीर सरकारने बस पाठवल्या आहेत. मात्र यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून इराणमधून येताना आम्ही थकलो असून प्रवासही लांबलचक झाला. त्यानंतर आता पुन्हा बसमधून 20 तास प्रवास करणे खूप कठीण आहे, असे विद्यार्थी म्हणाले.

माध्यमांशी बोलताना एक विद्यार्थ्याने सांगितले की, ‘आम्ही 20 तासांहून अधिक प्रवास करून हिंदुस्थानमध्ये आलो आहोत. या प्रवासाने आम्ही खूपच थकून गेलो आहोत. त्यानंतर आता पुन्हा बसने 20 तास प्रवास करणे आणि ते देखील अशा बसमध्ये शक्यच नाही.’

जम्मू-कश्मीर सरकारने प्रवासासाठी चांगली व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आम्ही इथे उतरलो तेव्हा पाहिले की विद्यार्थ्यांना नेण्यासाठी जुन्या बस पाठवण्यात आल्या. खरे तर लांबच्या प्रवासासाठी आराम बस पाठवायला हव्या होत्या. या बस लांबच्या प्रवासा लायक नाहीत, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

आखातातील युद्ध भडकले! इराण आक्रमक पवित्र्यात, शरणागती पत्करणार नाही; इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये 585 लोकांचा मृत्यू