महाकुंभसाठी 13 हजार रेल्वे गाडय़ा धावणार

भारतीय रेल्वेने नव्या वर्षात आपले नवीन वेळापत्रक जारी केले आहे. नव्या रेल्वे वेळापत्रकानुसार, अनेक गाडय़ांच्या वेळेत बदल करण्यात आले असून अनेक गाडय़ांच्या संख्येतही बदल करण्यात आले आहेत. महाकुंभासाठी 13 हजार गाडय़ा चालवल्या जातील. ज्यामध्ये 3 हजार विशेष फेअर गाडय़ांचा समावेश असेल. या महाकुंभात 45 कोटी भाविक सहभागी होतील. त्यापैकी 10 कोटी रेल्वेने प्रवास करतील असा अंदाज आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वे मंत्रालयाने 2025 मध्ये नमो भारत रॅपिड रेल (वंदे मेट्रो), दोन अमृत भारत एक्स्प्रेस गाडय़ा आणि वंदे भारत एक्स्प्रेस गाडय़ा सुरू करण्याची योजना आखली आहे.