
कराचीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर याचाच गैरफायदा घेत कराचीतील मलीर तुरुंगातून 216 कैदी पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भूकंपानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कैद्यांना बॅरेकमधून बाहेर काढण्यात आले होते. परंतु कैद्यांनी ही संधी साधून तुरुंगाच्या मुख्य गेटमधून पलायन केले. पळून गेलेल्या 216 पैकी 86 कैद्यांना पुन्हा पकडण्यात जेल प्रशासनाला यश आले आहे. परंतु बाकीचे कैदी अद्याप फरार आहेत. या वृत्ताला सिंध प्रांताचे गृहमंत्री झिया-उल-हसन लंजर यांनी मंगळवारी पहाटे पुष्टी दिली.
या घटनेनंतर लगेचच रेंजर्स आणि एफसीने तुरुंगाचा ताबा घेतला. तुरुंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पळालेल्या कैद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम अजूनही सुरू आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. तर चार सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत.