
मालाड येथे एका व्यक्तीच्या घरी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पळालेल्या टोळीला अखेर कुरार पोलिसांनी गजाआड केले. अब्दुल रफिक अन्सारी ऊर्फ अप्पू खोटा, दीपाली डंपर ऊर्फ दीपाली शर्मा, सूरज जाधव आणि आकाश चंद्रकांत पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नजीर खान हे मालाड येथे कुटुंबीयांसोबत राहतात. २४ मे रोजी त्यांच्या सासूचे निधन झाले. त्यामुळे खान हे कुटुंबीयांसोबत जळगाव येथे गेले होते. अंत्यविधी झाल्यानंतर ते मुंबईत आले होते. त्यानंतर १ जूनला त्यांच्या सासूचे दहावे होते. त्यामळे ते पुन्हा गावी गेले. तेव्हा घरात कोणी नसल्याचे पाहून चोरटे आत शिरले. चो रट्याने कपाटातील दागिने, चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन पळ काढला. खान हे गेल्या आठवड्यात मुंबईत आले तेव्हा त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. घडल्या प्रकरणी त्यांनी कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.