
अमेरिका एक युद्धाची परिस्थिती निर्माण करते, नाहीतर आपल्याला ‘सरेंडर’ होणारी सरकारे व पंतप्रधान निर्माण करते. जगभरातले हे चित्र असमतोल निर्माण करणारे आहे. इराण-इस्रायल युद्धाचा अंतिम निकाल काय लागतो ते पाहायला हवे, पण दोन्ही बाजूला मानवी जिवांचा नाहक बळी जात आहे. नेतान्याहू यांनी जीव वाचविण्यासाठी दुसऱ्या देशात पलायन केल्याची बातमीदेखील चिंताजनक आहे. लोकांनी मरायचे, नेत्यांनी युद्धभूमीवरून पळून जायचे.
तिसरे जागतिक महायुद्ध सुरू झाले असून जग विनाशाच्या खाईत ढकलले जात असल्याचे स्पष्ट दिसते. रशिया आणि युव्रेनमध्ये चार वर्षांपासून युद्ध पेटले आहे. इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरूच आहे. भारत-पाक संघर्ष धुमसतोच आहे. पाकच्या बाजूने चीन, तुर्पस्तान, अझरबैजान ही राष्ट्रे उभी राहिली. आता इस्रायल-इराणमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. मध्य-पूर्वेतील युद्धाची स्थिती भयावह बनली आहे. अमेरिका, ब्रिटन किंवा फ्रान्सने इस्रायलला मदत करण्याचा प्रयत्न केला तर या देशांच्या लष्करी तळांवर हल्ले करू असे इराणने उघडपणे धमकावले. इस्रायलवरील हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू, असे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी बजावले. त्याच रात्री इराणने राजधानी तेल अविववर क्षेपणास्त्रे टाकून इस्रायलचे प्रचंड नुकसान केले. तेल विहिरींवर बॉम्ब पडले आहेत. शेकडो माणसांचे बळी गेले आहेत. हे चित्र बरे नाही. प्रे. ट्रम्प यांनी भारत-पाकमध्ये युद्धविराम घडवला. युद्धविरामास पंतप्रधान मोदी यांनी मान्यता दिली. हाच धमकावण्याचा प्रयोग प्रे. ट्रम्प यांनी इराणवर केला. इराण ‘सरेंडर’ होईल असे ट्रम्प यांना वाटले, पण इराणने प्रे. ट्रम्प यांनाच धमकावले. ‘‘आमच्या भानगडीत पडू नका, उगाच नाक खुपसू नका, तुम्हाला महाग पडेल’’ असे इराणचे सर्वेसर्वा खोमेनी यांनी बजावले. त्यामुळे ट्रम्प यांची फुकट फौजदारकी वाया गेली. नेतान्याहू यांनी इराणवर हल्ला करून चूक केली. इराणला त्यांनी कमजोर समजण्यात चूक केली. इराणचे सैन्य अधिकारी, परमाणू शास्त्रज्ञ यांची हत्या घडवून इस्रायल विजय साजरा करीत आहे, पण इराण या परिस्थितीतही लढत आहे.
नेतान्याहू यांची पळापळ
सुरू आहे. अमेरिकेने इस्रायलच्या बाजूने युद्धात उतरावे असे नेतान्याहू यांना वाटते, पण प्रे. ट्रम्प यांची तेवढी हिंमत दिसत नाही. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एन्टोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना युद्ध ताबडतोब थांबविण्याचे आवाहन केले आहे. ही लढाई सुरूच राहिली तर त्याचा परिणाम जगावर होईल असे संयुक्त राष्ट्रांना वाटते, पण त्यांचे ऐकतेय कोण? जगातील कोणताही संघर्ष ‘युनो’ आतापर्यंत थांबवू शकलेला नाही. ‘युनो’ म्हणजे अमेरिकेच्या भूमीवर, अमेरिकेच्या पैशांवर पोसलेला बोका आहे. अमेरिकेने इराकचा सद्दाम, लिबियाचा गडाफी यांचा बळी घेतला तेव्हा हा बोका ‘मॅव’ करायलाही तयार नव्हता. आता त्यांच्या पोशिंद्यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे तेव्हा शांततेचे आवाहन केले जात आहे. इतिहासात नोंद केली जाईल की, इराण प्रे. ट्रम्प आणि इस्रायलच्या धमकीपुढे ‘सरेंडर’ झाले नाही. नाहीतर जगात असेही अनेक नेते आहेत की, अमेरिकेच्या एका फोनवर ‘सरेंडर’ होतात. ‘गाझा’ पट्टीत इस्रायलकडून अमानुष हल्ले झाले. शेकडो लहान मुले, अन्नाच्या रांगेत उभ्या असलेल्या महिला, वृद्ध नागरिकांवर बॉम्बहल्ले केले गेले, इस्पितळे बेचिराख करून मानवतेला काळिमा फासला तेव्हाही ‘युनो’च्या पत्रकबाजीला कोणी विचारले नाही. गाझातील निरपराध अर्भकांना वाचविण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. नेतान्याहू यांनी निर्दयपणे लहान मुलांचे बळी घेतले. आता इराण आमच्या मानवी वस्त्यांवर हल्ले करीत असल्याची छाती ते पिटत आहेत. इस्रायलवरील भयंकर हल्ल्याचे चित्र जग पाहत आहे. इस्रायलचे
सर्व सुरक्षा कवच भेदून
हल्ले सुरू आहेत. Iron dome batteries इमारतीच्या छतांवर ठेवले होते. त्यावरच सर्वाधिक आणि अचूक हल्ले झाले. इस्रायल व त्यांच्या समर्थकांना हे अपेक्षित नसावे. गाझा पट्टीत ज्याप्रमाणे नरसंहार झाला तोच ‘पॅटर्न’ इराणला वापरू व इराणच्या तेल विहिरींवर कब्जा मिळवू, अशी संयुक्त योजना अमेरिका आणि इस्रायलमध्ये ठरली असावी. इराणने सगळेच उलटेपालटे केले. अमेरिकेची फौजदारी व दादागिरी भारताने मान्य केली, पण इराणने प्रे. ट्रम्प यांना झिडकारले हे महत्त्वाचे. अमेरिकेचे माजी लष्करप्रमुख आणि नाटो कमांडर वेस्ले क्लार्प यांनी एक खुलासा करून अमेरिकेचा मुखवटा फाडला आहे. क्लार्प सांगतात, गेल्या पाच वर्षांत अमेरिकेने सात देशांत सत्तापालट करण्याच्या योजना आखल्या होत्या. हे देश म्हणजे इराक, सीरिया, सुदान, लेबेनॉन, लिबिया, सोमालिया आणि इराण, पण इराणचा खोमेनी सरेंडर व्हायला तयार नाही तेव्हा इस्रायलने युद्ध सुरू केले. याआधी पुतीन यांनी सांगितलेच आहे की, अमेरिकेला जगभरात युद्ध हवे आहे. त्यामुळे अनेक देशांत ठिणग्या उडाल्या आहेत. भारतासारखा देश अमेरिकेपुढे ‘सरेंडर’ झाला आहे. अमेरिका एक युद्धाची परिस्थिती निर्माण करते, नाहीतर आपल्याला ‘सरेंडर’ होणारी सरकारे व पंतप्रधान निर्माण करते. जगभरातले हे चित्र असमतोल निर्माण करणारे आहे. इराण-इस्रायल युद्धाचा अंतिम निकाल काय लागतो ते पाहायला हवे, पण दोन्ही बाजूला मानवी जिवांचा नाहक बळी जात आहे. नेतान्याहू यांनी जीव वाचविण्यासाठी दुसऱया देशात पलायन केल्याची बातमीदेखील चिंताजनक आहे. लोकांनी मरायचे, नेत्यांनी युद्धभूमीवरून पळून जायचे.