पाणी तुंबल्याचा दावा दिशाभूल करणारा, केईएम रुग्णालयाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

पहिल्याच पावसात मुंबईच्या केईएम रुग्णालयात पाणी तुंबल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने आज फेटाळून लावला. याप्रकरणी हायकोर्टात रुग्णालय प्रशासनाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले असून त्यात नमूद केले की, सखल भागामुळे काहीवेळ पावसाचे पाणी तळमजल्यावर आले व लगेच त्याचा निचरा झाला. त्यामुळे केईएम रुग्णालयात तळे साचल्याच्या बातम्या निराधार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.