
‘‘देशातील जे लोक इंग्रजी बोलतात त्यांना लवकरच त्याची लाज वाटेल,’’ असे वक्तव्य पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्याला आज जोरदार प्रत्युत्तर दिले. इंग्रजी भाषा आपल्याला सशक्त बनवते. त्यामुळे इंग्रजी बोलण्यात लाज कसली. प्रत्येक मुलाने इंग्रजी शिकायला हवे, असे स्पष्ट मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
राहुल गांधी यांनी एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. ‘‘इंग्रजी हा बांध नाही, एक पूल आहे. इंग्रजी ही लाज नाही, ती शक्ती आहे. इंग्रजी ही साखळी नाही, ती साखळय़ा तोडण्याचे एक साधन आहे. आजच्या जगात इंग्रजी ही तुमच्या मातृभाषेइतकीच महत्त्वाची आहे. कारण ती रोजगार देईल आणि आत्मविश्वास वाढवेल. मात्र भाजप-आरएसएस यांना देशातील गरीब मुलांनी इंग्रजी शिकावे, प्रश्न विचारावे, समान व्हावे असे वाटत नसल्याने ते इंग्रजी शिपू नये अशी भूमिका घेत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.