मेंदूत ‘एन्युरिझम’, तरीही काम करतोय; सलमान खानला जडलाय गंभीर आजार, कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा

बॉलीवूड अभिनेता, ‘दबंग’ सलमान खान मीडियामध्ये चर्चेत असतो. कधी आपल्या चित्रपटांद्वारे तो चाहत्यांचे मन जिंकतो, तर कधी गँगस्टरकडून मिळालेल्या धमकीने चिंता वाढवतो. या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असलेल्या सलमानने कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये आपल्या आरोग्याशी संबंधित मोठा खुलासा केला आहे. आपल्याला आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या असून त्यांचा सामना करत काम सुरू ठेवल्याचे त्याने सांगितले. यामुळे चाहत्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे.

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सिझनचा पहिला भाग शनिवारी रात्री नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला. पहिल्याच भागात 59 वर्षीय अभिनेता सलमान खान प्रमुख पाहुणा म्हणून आला होता. या एपिसोडमध्ये सलमान नेहमीप्रमाणे फिट दिसला, मात्र त्याने लग्न, आरोग्य आणि आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत खुलासे केले.

कपिल शर्माने लग्नाबाबत विचारले असता सलमान म्हणाला की, लग्न आणि घटस्फोट हे भावनिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून खूप कठीण असतात. आयुष्याच्या या टप्प्यावर नव्याने सुरुवात करणे सोपे नसते. यानंतर त्याने आपल्या आरोग्याबाबत सांगितले. तो म्हणाला की, काम करत असताना आरोग्याच्या अनेक समस्यांशीही झुंज देत आहे.

मी रोज हाडांना मालीश करून घेत असतो. फासळ्या तुटल्या आहेत. ‘ट्रायजेमिनल न्युराल्जिया’ असूनही काम करतोय. मेंदुमध्ये ‘एन्युरिझम’ आहे, तरीही काम करतोय. ‘एव्ही मालफॉर्मेशन’ आहे, तरीही मी पुढे चाललोय, असे सलमान खान म्हणाला.

सलमानने केलेला आत्महत्येचा विचार

या आजारांमुळे चेहऱ्यावरील नसा सुजतात. असह्य वेदना होतात. हा आजार असणारे अनेक रुग्ण मानसिक तणावाचेही बळी ठऱतात. 2017 मध्ये ट्युबलाईटला दिलेल्या मुलाखतीत सलमान खान यानेही आपण या आजारांनी त्रस्त झालो होतो आणि एकेकाळी आत्महत्या करण्याचा विचार केला होता असे सांगितले होते. मात्र मी हिंमत हारली नाही आणि कठोर परिश्रम करत राहिलो, असेही सलमानने सांगितले होते.

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हा आजार काय आहे?

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हा मेंदूचा आजार आहे. हा एक न्युरोलॉजिकल आजार आहे, ज्यामध्ये चेहऱ्याच्या नसांमध्ये तीव्र वेदना होतात. ज्यामुळे चेहऱ्याच्या एका भागात तीव्र वेदना होतात. वेदना जेव्हा असह्य होतात तेव्हा मनात आत्महत्येचेही विचार येतात. त्यामुळे याला ‘आत्महत्येचा आजार’ असेही म्हणतात. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक औषधे, इंजेक्शन, शस्रक्रिया कराव्या लागतात. तसेच योगा, व्यायामही आवश्यक असतो.

350 कोटी गमावल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टीला आली जाग! घेतला महत्त्वाचा निर्णय, वाचा