
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठी माणूस आणि एकजुटीमुळे सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांकडूीन विधानभवनाच्या पायऱ्यांवर मराठीचा जागर करण्यात आला.
‘हिंदीसक्ती’ शासन निर्णय सरकारने मागे घेतल्यावर, तमाम मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरकारच्या मुजोरीला मराठी माणूस ऐकणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. यामुळेच आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर केलेला जागर हा मराठी माणसाच्या एकजुटीचा जागर होता. आमदारांनी यावेळी ‘माघार सरकार, यू टर्न सरकार’, अशी घोषणाबाजी केली.
कोणाचीही समिती बसवली तरी महाराष्ट्रावर आता कोणाचीही सक्ती होऊ शकत नाही – उद्धव ठाकरे
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार भास्कर जाधव, अनंत नर, सचिन अहीर, अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर ‘मी मराठी’चा गजर केला आणि ‘माघार सरकार, यू टर्न सरकार’, अशी घोषणाबाजी केली. pic.twitter.com/L0izkOwUyx
— Saamana Online (@SaamanaOnline) June 30, 2025
दरम्यान, पावसाळी अधिवेशन 2025 च्या पहिल्या दिवशी विधानभवनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि आशीर्वाद घेतले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशी घोषणाबाजी करण्यात आली.
जय भवानी, जय शिवाजी! विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि आशीर्वाद घेतले. pic.twitter.com/qiRjYGiYLA
— Saamana Online (@SaamanaOnline) June 30, 2025