
मतदार यादीत घोटाळे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी भाजपच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होऊ नये, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले आहेत. निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर टीका करत ते असे म्हणाले आहेत.
X वर एक पोस्ट करत अखिलेश यादव म्हणाले आहेत की, “मतदार यादीत घोटाळे करणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांपासून ते बूथ स्तरावरील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांवर कठोर कारवाई होईल. अशा गैरप्रकारांमध्ये सामील असलेल्यांविरुद्ध एफआयआर दाखल होईल, त्यांना निलंबन आणि दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. याशिवाय असे कर्मचारी आपल्या विभागात, कुटुंबात आणि समाजात देशाशी विश्वासघात करणारे म्हणून दोषी ठरतील.”
अखिलेश यादव यांनी पुढे म्हटले की, “निवडणुकीत हेराफेरी करणारे भाजप नेते आपले हेतू साध्य झाल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांना ओळखणारही नाहीत, त्यांना वाचवणे तर दूरच.” त्यांनी भाजपवर आरोप केला की, भाजप आपल्याच नेत्यांविरुद्ध बुद्धिबळाच्या खेळी खेळत राहते, तेव्हा इतरांचे काय? भाजपच्या गैरप्रकारांमध्ये सहभागी होऊन कोणताही गुन्हा करण्यापूर्वी सावध व्हावे, कारण भाजपा कुणाचीही नाही.” त्यांनी शेवटी म्हटले की, भाजप गेल्यास खरी सरकार येईल.
वोटर लिस्ट में घपला करनेवाला बड़े-से-बड़ा अधिकारी और बूथ स्तर तक का चुनावकर्मी देख ले कि उसकी बेईमानी पकड़े जाने पर उसके ख़िलाफ़ इसी प्रकार FIR भी होगी और निलंबन व दंडात्मक कार्रवाई भी। वो अपने विभाग, परिवार और समाज में देश के साथ दगा करने का दोषी घोषित होगा, साथ ही सज़ा पाकर एक… pic.twitter.com/cqWmpk0Gfo
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) August 17, 2025