
अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने दत्तजयंती उत्सवाची सांगता आज सायंकाळी निघालेल्या ‘श्रीं’च्या पालखी मिरवणुकीने झाली.
श्री दत्तजयंतीनिमित्त आज दुपारी 12 ते 3 या वेळेत वटवृक्ष देवस्थानच्या वतीने भक्तनिवास येथील भोजनकक्षात स्वामिभक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आला. हजारो स्वामिभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तद्नंतर सायंकाळी 5 वाजता सद्गुरू श्री स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीची प्रारंभिक आरती पुरोहित मोहन पुजारी, मंदार पुजारी यांच्या हस्ते झाली. मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते पालखी पूजन करून पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला.
पालखी मिरवणुकीत प्रथमेश इंगळे, मंदार महाराज पुजारी यांच्यासह सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त संपतराव शिंदे, महेश गोगी, उज्ज्वला सरदेशमुख, राजेश निलवाणी प्रा. नागनाथ जेऊरे, गणेश दिवाणजी, रामचंद्र समाणे, गिरीश पवार, सागर गोंडाळ, संजय पवार, नरसिंग क्षीरसागर, प्रसन्न हत्ते, किरण किरात, शशिकांत लिंबितोटे, अमर पाटील, निखिल पाटील, दिलीप हजारे, शिवशरण अचलेर, संजय बडवे, चंद्रकांत सोनटक्के, प्रसाद किलजे, अण्णा सावंत, विजय इंगळे, प्रसाद सोनार, ऋषिकेश लोणारी, स्वामिनाथ लोणारी, महेश काटकर, संतोष जमगे, श्रीशैल गवंडी, अक्षय सरदेशमुख, बाळासाहेब घाटगे, प्रदीप हिंडोळे, बंडेराव घाटगे यांच्यासह मराठवाडय़ातील लातूर, धाराशीव, उमरगा, तुळजापूर इत्यादी भागांतून दिंडय़ांसह टाळकरी, विणेकरी आदींसह हजारो स्वामिभक्त सहभागी झाले होते.
‘श्रीं’ची पालखी मिरवणूक अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गांवरून बुधवार पेठेतील श्री स्वामी समाधी मठापर्यंत व तेथून रात्री नऊ वाजता पालखी मिरवणूक वटवृक्ष मंदिरात दाखल झाली. त्यानंतर देवस्थानच्या वतीने शिरा प्रसादवाटप करून दत्त जयंती उत्सवाचा सांगता समारंभ झाला.





























































