फोनचं आमिष दाखवून मुलांना गप्प करताय? मग हा आहे धोका

आजकाल रडणाऱ्या मुलांना मोबाईल फोनने शांत करण्याचा ट्रेंड बनला आहे. रेस्टॉरंट असो, ट्रेन असो, घर असो सर्वत्र हेच दृश्य दिसते: मुलं शांतपणे मोबाईल फोन किंवा टॅब्लेटच्या स्क्रीनमध्ये रमलेले असतात. यामुळे पालकांना त्यांच्या रडण्यापासून आणि हट्टीपणापासून विश्रांती मिळते. कालांतराने पालकांना, मोबाईल फोन देणे हे त्यांना शांत करण्याचा, त्यांना खायला घालण्याचा किंवा थोडी शांतता मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग वाटतो. स्क्रीन दिसताच मूल शांत होते, ज्यामुळे पालक बेफिकीर राहतात. परंतु मुलांना फोन किंवा टॅब्लेट देणे त्यांच्या मेंदूवर, वर्तनावर आणि भावनांवर परिणाम करू शकते.

“स्क्रीन-वाइबिंग” करणे म्हणजे काय?

बहुतेक पालक मुलांना जेवण देताना, झोपवताना किंवा बाहेर फिरायला गेल्यावर मोबाईल फोन किंवा टॅब्लेट देतात. असे केल्याने, स्क्रीन पाहिल्यानंतर मूल शांत होते आणि काही क्षणांसाठी शांतता मिळते. या सवयीला ‘स्क्रीन वाइपिंग’ म्हणतात. म्हणजेच, मुलाला शांत करण्यासाठी स्क्रीन वापरणे. सुरुवातीला, हा एक सोपा उपाय वाटतो, परंतु हळूहळू ही सवय मुलाच्या आरोग्यावर आणि विकासावर परिणाम करू लागते. एखादा मुलगा मोबाईल किंवा टॅब्लेट जास्त पाहत असेल तर त्याच्यामध्ये काही समस्या उद्भवू शकतात. अनेक मुलं शांत झोपत नाहीत, तसेच त्यांचे लक्ष देखील सहजपणे विचलित होते. शिवाय, काही मुले चिडचिडी होतात, इतरांसोबत खेळण्यापेक्षा एकटे खेळणे पसंत करतात आणि इतरांशी बोलणे देखील टाळतात. या समस्या हळूहळू विकसित होतात.

बालपणात मुलाचा मेंदू वेगाने विकसित होतो. या काळात त्यांना संवाद, खेळ, प्रश्न विचारणे आणि भावनिक जोडणीची सर्वात जास्त आवश्यकता असते. मोबाईल फोनमुळे मुलं कमी बोलतात, कमी ऐकतात आणि लोकांच्या भावना समजून घेण्यास कमी सक्षम होतात. स्क्रीन्स त्यांना व्यग्र ठेवतात, परंतु ते त्यांच्या शिकण्याच्या संधी हिरावून घेतात.

पालक स्क्रीनवर का अवलंबून आहेत?

बहुतेक पालकांना माहित आहे की कारण काहीही असो, जास्त मोबाइल वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे. तरीही, ते अनेकदा त्यांच्या मुलांना मोबाइल फोन देतात. आज बहुतेक घरांमध्ये, दोन्ही पालक काम करत आहेत. त्यामुळे ते थकतात त्यांना विश्रांतीची गरज आसते आणि त्यामध्ये त्यांना मदत करण्यासाठी कोणीही नसल्यामुळे मोबाइल फोन त्यांचा सर्वात सोपा आधार बनतो. हळूहळू हा आधार मुलांची सवय बनते आणि मुलं फोनशिवाय राहू शकत नाही.

मुलांना शांत ठेवण्यासाठी, स्क्रीनऐवजी या गोष्टी करा

मुलांना सर्वात जास्त स्क्रीनची गरज नाही तर वेळ देण्याची गरज आहे. त्यांना फोन किंवा टॅब्लेट देण्याऐवजी त्यांच्याशी बोला, त्यांना गोष्टी सांगा, त्यांच्यासोबत खेळा. या छोट्या-छोट्या गोष्टी त्यांचे मन आणि हृदय दोन्ही मजबूत करतात. जर तुमचे मूल कंटाळले असेल तर, तुम्ही त्यांना घरकामात लहान गोष्टीत सहभागी करून घेऊ शकता. अशा प्रकारे, त्यांचा स्क्रीन टाइम पूर्णपणे कमी करण्याऐवजी तुम्ही त्यांचा स्क्रीन टाइम हळूहळू कमी करू शकता.