
पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, 32 जण जखमी झाले आहेत. अनेक पर्यटक नदीत वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी कुंडमळा येथील दुर्घटनेबाबत पोस्ट करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.
आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळी पूल कोसळून घडलेली दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी आहे. या दुर्घटनेत इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचविण्यात बचाव पथकाला यश मिळू दे, सर्वजण सुखरूप असू देत; हिच ईश्वर चरणी प्रार्थना!”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मावळ तालुक्यातील कुंडमळा ह्या पर्यटनस्थळी पूल कोसळून घडलेली दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी आहे.
ह्या दुर्घटनेत इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचविण्यात बचाव पथकाला यश मिळू दे, सर्वजण सुखरूप असू देत; हिच ईश्वर चरणी प्रार्थना! pic.twitter.com/cyWyZYiQde— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 15, 2025