Akola News – धरणाच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले

धरणाच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अकोल्यात घडली. योगेश आश्रुबा डाहाळे आणि कार्तिक कृष्णा डाहाळे अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. बोरमळी चेलगाव येथील धरणात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह बाहेर काढले.

योगेश आणि कार्तिक दोघेही चिखलगाव येथील रहिवासी होते. दोघेही धरणाच्या पाण्यात अंघोळीसाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. आपत्कालीन पथकाने अथक प्रयत्न करत 20 फूट खोल पाण्यातून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे डाहाळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.