
इराण आणि इस्रायलमधील युद्ध दहाव्या दिवशीही सुरू आहे. या युद्धामध्ये आता अमेरिकाही उतरली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ले करत हे तळ नष्ट केले. एकीकडे दोन्ही देशांमधील संघर्ष महायुद्धाकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे हिंदुस्थाननेही वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.
इराणच्या युद्धग्रस्त भागातून आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू करण्यात आले असून आहे. आतापर्यंत 1117 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. ‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत महन एअरची दुसरी विशेष फ्लाइट W5071 शनिवारी रात्री दिल्ली विमानतळावर उतरली. या विमानातून 290 विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे आणण्यात आले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली.
इराणहून हिंदुस्थानी नागरीक आणि विद्यार्थ्यांना घेऊन रात्री साडे अकरा वाजता विमान दिल्लीत उतरले. इराणमधून आतापर्यंत 1117 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. ‘ऑपरेशन सिंधू’ने वेग पकडला असून रविवारी इराणहून येणारे आणखी दोन विमाने दिल्लीमध्ये उतरतील, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.
#OperationSindhu gains momentum.
290 Indian nationals have returned home safely from Iran on a special flight from Mashhad that landed in New Delhi at 2330 hrs on 21 June 2025.
With this, 1,117 Indian nationals have been evacuated from Iran. pic.twitter.com/FScyeKslzw
— Randhir Jaiswal (@MEAIndia) June 21, 2025
शनिवारी रात्री इराणहून आलेल्या विमानामध्ये 290 प्रवासी होते. यापैकी बहुतांश विद्यार्थी होते. यामध्येही सर्वाधिक विद्यार्थी जम्मू-कश्मीर राज्यातील होते. या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्यासाठी जम्मू-कश्मीर सरकारनेही बसची व्यवस्था केली आहे.
दरम्यान, जम्मू-कश्मीर स्टूडेंट्स असोसिएशनने या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनवर प्रतिक्रिया दिली असून, जे कुटुंबीय आपली मुलं सुरक्षित परत येतील अशी आस लावून बसले होते त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले.
सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू! इराणची अमेरिकेला धमकी, सरकारी वाहिनीवरून मोठी घोषणा