
फ्रीझी आणि निर्जिव केस ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. हवामानातील बदल, आर्द्रतेचा अभाव, रोज शॅम्पू करणे, वेगवेगळ्या रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर यामुळे केसांची नैसर्गिक आर्द्रता दूर होते. केसांचा ओलावा जेव्हा कमी होतो, तेव्हा त्याचा वरचा थर उघडण्यास सुरवात होते आणि केस कडक आणि हाताळण्यास कठीण होतात. अशा परिस्थितीत अनेकदा आपण महागडे सीरम, हेअर मास्क आणि उपचार करतो, परंतु आयुर्वेद आणि घरगुती उपायांमध्ये तूप लावण्याचा एक जुना उपाय सांगण्यात आला आहे. तूप हा हिंदुस्थानी घरांमध्ये पौष्टिकतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये असलेले फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन A, D आणि E केसांना बाहेरून पोषण देण्यास मदत करतात.
तुप नियमितपणे लावले जाते तेव्हा केस मऊ, गुळगुळीत आणि कमी फ्रिझी दिसतात. विशेषत: ज्या लोकांचे केस खूप कोरडे आणि दाट आहेत, त्यांना यातून चांगले परिणाम दिसू शकतात. तूप आठवड्यातून दोन वेळा सुमारे एक महिन्यापर्यंत योग्यरित्या वापरले गेले तर केसांमधील फरक 2-3 आठवड्यांत जाणवू लागतो.तूप हा जादूचा पिटारा आहे. तूप केसांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. तूप लावण्याची पद्धतही खूप सोपी आहे.
सर्वप्रथम, थोड्या प्रमाणात शुद्ध देसी तूप हलके कोमट करा. नंतर टाळूवर आणि केसांच्या लांबीवर बोटांच्या मदतीने हलक्या हाताने लावा. जास्त मसाज करण्याची गरज पडत नाही. ते 20 ते 30 मिनिटे केसांमध्ये ठेवा आणि नंतर धुवून काढा. केसांमध्ये रात्रभर तूप ठेवणे योग्य मानले जात नाही, कारण यामुळे टाळूवर घाण चिकटू शकते आणि छिद्र बंद होण्याचा धोका असतो. काही लोक चांगल्या परिणामासाठी तूपात नारळ तेल किंवा कोरफड जेल देखील वापरतात. यामुळे मॉइश्चरायझिंग वाढते आणि केस अधिक चमकदार दिसतात. ज्यांचे केस खूप पातळ किंवा तेलकट आहेत त्यांना तूप जड वाटू शकते. अशा परिस्थितीत, थोड्या प्रमाणात सुरुवात करणे महत्वाचे आहे.
केसांना तूप लावणे ही पारंपरिक आयुर्वेदीय पद्धत असून अनेक घरांमध्ये ती आजही वापरली जाते. तूप हे शुद्ध चरबीचे उत्तम स्रोत आहे. केसांना तूप लावल्यामुळे टाळूला पोषण मिळते आणि केस मुळांपासून मजबूत होण्यास मदत होते. विशेषतः कोरडे आणि निस्तेज केस असणाऱ्यांसाठी तूप उपयुक्त ठरू शकते. नियमितपणे तूप लावल्याने केसांमध्ये खाज सुटत नाही तसेच तूप केसांमध्ये नैसर्गिक चमक आणते आणि केस मऊ व रेशमी बनवते. टाळूची मालिश तुपाने केल्यास रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळते. आयुर्वेदानुसार तूप थंड असल्याने डोक्यातील उष्णता कमी होते, ज्यामुळे ताणतणाव, डोकेदुखी आणि निद्रानाश कमी होण्यास मदत मिळते.

























































