Relationship Tips- छोट्या गोष्टींवरुन तुमचे जोडीदारासोबत खटके उडताहेत का? नातं टिकवण्यासाठी या टिप्सचा वापर करा

आजकाल कामाच्या वाढत्या ताणामुळे कोणाकडेही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ नाही. कामाचा हा वाढता ताण केवळ आपल्या शारीरिक आरोग्यालाच हानी पोहोचवत नाही तर आपली मानसिक स्थिती देखील बिघडवत आहे. हेच कारण आहे की, अलीकडे जोडप्यांमध्ये चिडचिड वाढू लागली आहे. नवरा बायकोमधील चिडचिड ही नाते संपुष्टात येण्याचं एक पहिलं पाऊल आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला राग येत असेल तर, वेळीच सावध व्हायला हवे. काही सोप्या टिप्स फॉलो करून, तुमच्या जोडीदाराचा राग शांत करू शकता आणि तुमच्या नाते नव्याने फुलवू शकता.

काही जणांना छोट्या छोट्या गोष्टींवरून भावनिक होण्याची सवय असते. गरजेपेक्षा जास्त भावनिक होत असाल, तर तुमच्या जोडीदाराच्या रागाचे हे देखील एक कारण असू शकते. तुमच्या भावना व्यक्त करणे महत्त्वाचे आहे, परंतु त्याबद्दल वारंवार बोलणे चुकीचे ठरु शकते.

प्रेमी युगुलांमधील ब्रेकअपसाठी जबाबदार आहेत ‘या’ सवयी

तुमचा जोडीदार रागावला असेल, तर त्या काळात वारंवार प्रश्न विचारल्यानेही राग वाढू शकतो. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराचा राग शांत होण्याची वाट पहा. तुमचा जोडीदार रागावला असताना तो तुम्हाला योग्य उत्तर देणार नाही आणि उलट, वारंवार प्रश्न विचारल्याने त्याचा राग शांत होणार नाही. म्हणून राग कमी होण्याची वाट पाहणे महत्वाचे आहे.

वारंवार राग येण्याचे कारण चुकीच्या पद्धतीचा संवाद हेदेखील कारण आहे. तुमच्या जोडीदाराला असे वाटत असेल की, तुम्ही त्याचे ऐकत नाही तर हे देखील त्याचा राग वाढण्याचे कारण असू शकते. म्हणून जेव्हा तुमचा जोडीदार रागावतो तेव्हा तुम्ही त्याचे म्हणणे नेहमी काळजीपूर्वक ऐकले पाहिजे. तुम्ही असे केले तर तुमचा जोडीदार तुम्हाला राग आल्यावर तुमचे ऐकण्याचा प्रयत्न करेल.

नातेसंबंधांमध्ये नेहमीच काही ना काही भांडणे होतात. परंतु एखादा जुना मुद्दा उपस्थित करता किंवा जुना वाद नव्याने उकरुन काढता, तेव्हा राग शांत होण्याऐवजी तो वाढतो. म्हणून रागावलेले असताना तुमच्या जोडीदारासोबत कोणताही जुना विषय काढू नका.