Breaking- मध्य रेल्वे लोकलसेवा ठप्प!

मुंबईत पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे, मध्यरेल्वेची लोकलसेवा आता ठप्प झाली आहे. सायन रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूकीवर मोठा परीणाम झालेला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते भायखळा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. अप डाऊन हार्बर मार्गावरील रेल्वेलाईन ठप्प झालेली आहे. मुंबईत सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 134 मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

मंत्रालय परीसरातही पाणी साचले आहे. तसेच मुंबईत पुढील काही तास पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. मुंबईस उपनगरामध्ये सध्या सखल भागांमध्ये पाणी साचण्यास आता सुरुवात झालेली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर मोठा परीणाम झालेला आहे.

 

सविस्तर वृत्त लवकर…