
लातूरातून स्व.विलासराव देशमुखांची ओळख पुसून टाकण्यास निघालेल्या भाजपला लातूरकरांनी जोरदार हबाडा दिला.स्वाभिमानी लातूरकरांच्या अस्मितेसमोर भाजपचा सुपडा साफ झाला तर काॅंग्रेसची एकहाती सत्ता महापालिकेवर स्थापन झाली. तब्बल ४३ जागा काॅंग्रेसने मिळवल्या तर युतीत ४ जागा वंचितनेही मिळवल्या. तिसरा पर्याय म्हणून समोर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाला फक्त एक जागा मिळाली आहे.
दुसऱ्या टप्पा मध्ये प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 5,प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 17, तिसऱ्या टप्पा मध्ये प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 18 या प्रभागांची मतमोजणी करण्यात आली. प्रत्येक प्रभाग साठी 10 टेबलवर मतमोजणी सुरू करण्यात आली . एका वेळी एक प्रभागाचा 10 बूथ ची मोजणी करण्यात येत होती.
लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीत विजयी उमेदवार पुढील प्रमाणे आहेत प्रभाग क्रमांक एक अ मधून थोरात मनोज अरुण यांना ६४९४ मते मिळाली व ते विजयी झाले. १ ब मधून मदने चंद्रकला महादेव यांनी ५८७६ मते घेतली व विजय मिळवला.१ क मधून शेख तबसुम आरिफ यांनी ४४९५ मते घेतली व विजय मिळवला. १ ड मधून काळे देविदास रामलिंग यांनी ४७७० मते घेऊन विजय मिळवला. प्रभाग २ अ मधून भडीकर अंकिता प्रशांत यांनी ४३९० मते घेऊन विजय मिळवला. २ ब मधून बंडापल्ले सचिन श्रीरंग यांनी ४९०३ मते घेऊन विजय मिळवला. २ क मधून गोलंदाज शहनाज आसिफ यांनी ४६५१ मते घेऊन विजय मिळवला. २ ड मधून शेख फारुख कासिमसाब यांनी ४१६१ मते घेऊन माजी आमदार पाशा पटेल यांच्या मुलाचा दारुण पराभव केला आहे.
प्रभाग क्रमांक ३ अ मधून बसपुरे मनिषा संभाजी यांनी ४७३१ मते घेऊन विजय मिळवला. ३ ब मधून साबदे विजयकुमार हणमंतराव यांनी ३८३२ मते घेऊन विजय मिळवला. ३ क मधून शेख जरिनाबी अल्लाबक्ष यांनी ३९५१ मते घेऊन विजय मिळवला. ३ ड मधून कांबळे विकास सतिष यांनी ४५८३ मते घेऊन विजय मिळवला. प्रभाग क्रमांक ४ अ मधून सचिन अर्जुनराव गायकवाड यांनी ५५६८ मते घेऊन विजय मिळवला. ४ ब मधून गोरिबी आसेफ बागवान यांनी ५३९४ मते घेऊन विजय मिळवला.४ क मधून शेख कौसर इस्माईल यांनी ५३८९ मते घेऊन विजय मिळवला. ४ ड मधून अहेमदखां अमिरखां पठाण यांनी ४५५४ मते घेऊन विजय मिळवला. प्रभाग क्रमांक ५ अ मधून मंगेश दिलीप सोनकांबळे यांनी ४५६९ मते घेऊन विजय मिळवला. ५ ब मधून इगे सुरेखा नामदेव यांनी ५२४० मते घेऊन विजय मिळवला. ५ क मधून शेख नसरिन असलम यांनी ४७४१ मते घेऊन विजय मिळवला. ५ ड मधून गोजमगुंडे विक्रांत विक्रम यांनी ४७२९ मते घेऊन विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक ६ अ मधून गणेश इश्वरअप्पा गवारे यांनी ४७२५ मते घेऊन विजय मिळवला. ६ ब मधून ज्योती दिपक आवस्कर यांनी ४५०८ मते घेऊन विजय मिळवला. ६ क मधून अग्रवाल मंजुळा जयप्रकाश यांनी ४६२३ मते घेऊन विजय मिळवला. ६ ड मधून ब्याळे गिरीष गुरुनाथप्पा यांनी ३६४४ मते घेऊन विजय मिळवला. प्रभाग क्रमांक ७ मधून अ मधून निकीता रोहित सोमवंशी यांनी ४६७६ मते घेऊन विजय मिळवला. ७ ब मधून तांबोळी रुबीना सुलेमान यांनी ८२३८ मते घेऊन विजय मिळवला. ७ क मधून ॲड.अतिश चंद्रकांत चिकटे यांनी ५९२९ मते घेऊन विजय मिळवला. ७ ड मधून मोमिन युनूस महंमद युसुफ यांनी ५३२८ मते घेऊन विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक ८ अ मधून अभिषेक राजेंद्र पतंगे यांनी ६४४० मते घेऊन विजय मिळवला. ८ ब मधून रेहानाबेगम ताहेरअली घंटे यांनी ५५१८ मते घेऊन विजय मिळवला. ८ क मधून श्रावणी बालाजी झिपरे यांनी ६६०९ मते घेऊन विजय मिळवला. ८ ड मधून स्नेहल सुधाकर उटगे यांनी ४६७९ मते घेऊन विजय मिळवला. प्रभाग क्रमांक ९ अ मधून योगेश उमाकांत स्वामी यांनी ४२५५ मते घेऊन विजय मिळवला. ९ ब मधून तबस्सुम मुख्तार शेख यांनी ५७९७ मते घेऊन विजय मिळवला. ९ क मधून किसवे सपना पांडुरंग यांनी ६४४४ मते घेऊन विजय मिळवला. ९ ड मधून सगरे इसरार जब्बार यांनी ६१७० मते घेऊन विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक १४ अ मधून शिंदे करुणा मोहन यांनी 4346 मते घेऊन विजय मिळवला. १४ ब मधून तेलंगे उद्धव बापूराव यांनी 4562 मते घेऊन विजय मिळवला. १४ क मधून घोरपडे स्वाती प्रवीण यांनी ४०४२ मते घेऊन विजय मिळवला. १४ ड मधून जाधव रविशंकर दत्तोबा यांनी 4841 मते घेऊन विजय संपादन केला.






























































