
महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांत चांगला समन्वय असल्याचा दावा सातत्याने केला जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही नेते संवादात चांगले नसल्याचे स्पष्ट केले.
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवादात कोण चांगलं आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना एका इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत करण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत, असे सांगत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्रुटी दाखवली आहे. पक्षश्रेष्ठाRसोबत मतभेद झाले तर तुम्ही या दोघांपैकी कोणाचा सल्ला घ्याल? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. यावर फडणवीस यांनी आपण अजित पवार किंवा शिंदे यांचा सल्ला घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
शरद पवारांचे कौतुक
शरद पवार या वयातही जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करत राहतात, असे कौतुक फडणवीस यांनी केले.