मुंबईत मुसळधार पावसांच्या प्रमाणात वाढ, अवघ्या चार तासांत अतिवृष्टीच्या 28 घटना; पालिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती

मुंबईत मुसळधार पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच फक्त चार तासांच्या अवधीत 28 वेळा अतिवृष्टी झाली आहे. मुंबई महानगर पालिकेने केलेल्या अंतर्गत विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. पालिकेने Automatic Weather System तंत्रज्ञानाच्या माध्यमतून मुंबईच्या पावसाची नोंद केली. आणि या नोंदीच्या आकडेवारीतून हे विश्लेषण केले आहे. 26 मे रोजी मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्याच पार्श्वभूीवर पालिकेने ही पाहणी केली होती. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार 2014 ते 2018 या कालावधीत जेव्हा मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला, तेव्हा एक दिवसातील सरासरी पावसाचे प्रमाण 131 मिमी इतके होते. मात्र 2019 ते 2024 या कालखंडात हे प्रमाण वाढून 182 मिमी इतके झाले. विशेष म्हणजे 25 जुलै 2024 रोजी मुंबईत 267 मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या दहा वर्षातला हा सर्वात मोठा मुसळधार पाऊस ठरला होता.

केवळ 4 तासांत अतिवृष्टी
गेल्या दहा वर्षांत 4 तासांच्या आत अतिवृष्टी झाल्याच्या 28 घटना नोंदवण्यात आल्या आहेत. एकूण पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे या पावसामुळे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दरवर्षी उपाययोजना करूनही मुंबईत सतत पाणी भरण्याच्या घटना वाढत आहेत अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बंगर यांनी दिली आहे.