जगात शांततेसाठी हिंदुस्थानची भूमिका महत्त्वाची, इस्रायल-इराण युद्धावर मल्लिकार्जुन खर्गे यांचं वक्तव्य

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कलबुर्गी येथे इस्रायल-इराण संघर्षावर भाष्य करताना जगात शांततेची गरज असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, “आम्हाला जगात शांतता हवी आहे, इराणने नेहमीच आपल्या संकटात साथ दिली आहे. हिंदुस्थान आणि इराण यांच्यात नेहमीच व्यापार होत आला आहे. जर फक्त युद्ध झाले तर महागाई वाढेल, शांतता राहणार नाही, आम्हाला जगात शांतता प्रस्थापित करायची आहे, म्हणून मग ते इस्रायल असो, अमेरिका असो, पाकिस्तान असो किंवा इराण असो, या सर्व देशांनी शांततेत राहावे आणि जे शांततेत राहतात त्यांना आपण मदत करावी.”

खरगे पुढे म्हणाले, “हिंदुस्थानचा सिद्धांत आहे की सर्वांनी एकत्र राहावं आणि जगात शांती प्रस्थापित करावी. कोणतीही समस्या असल्यास ती चर्चेतून सोडवली पाहिजे. कोणत्याही देशाने दुसऱ्या स्वायत्त, लोकशाही देशावर हल्ला करू नये, यामुळे जगात शांती राहणार नाही. मग तो इराण असो, अमेरिका असो वा इतर कोणताही देश, स्वायत्त देशावर हल्ला करणं चुकीचं आहे. हिंदुस्थान नेहमीच शांततेच्या बाजूने राहिला आहे.”